April 24, 2016

तमाशा

        आपण नेमके आहोत कोण ? आपल्या हृदयात नक्की काय चाललय अन् आपण करतोय काय , हे न पाहताच आपण सारेच कधी ही न संपणाऱ्या स्पर्धेत  पळतोय . ही स्पर्धा समाजमान्य असते व यामुळे आपल्याला समाजात 'सन्मान' मिळतो ! या मध्ये वागायचे कसे , संवाद कसे साधायचे , एटीकेट्स आणि मॅनर्स कसे पाळायचे याचा अभिनय शिकवला जातो , आणि आयुष्य कधी " तमाशा " बनून जाते , कळतही नाही .
        ईश्वराने प्रत्येकला वेगवेगळे निर्माण केलय. वेगवेगळ्या आवडीनिवडी आणि वेगवेगळी सामार्थ्ये दिलीत.  पण स्पर्धेमध्ये  पळता पळता आपण हे ही विसरून जातो की आपल्याला नक्की हवं काय आहे ? आपला खरा आनंद नेमका कशात आहे. आणि जरी याच उत्तर मिळालाच तरी त्यासाठी 'सो कॉल्ड' समाजमान्य धोपट मार्ग सोडण सामान्य माणसाच्या व्यवहारीकतेमध्ये बसत नाही अन् तेवढ धाडसही असत नाही. अशातच एखादी प्रेमळ व्यक्ती, जी आपल्यातला खऱ्या प्रतिभेला आणि आपल्याला जाणते , आपल्यावर विश्वास टाकून आपल्यातल्या स्वत्वाला प्रोत्साहित करते. अन् अचानक आयुष्याला खरा अर्थ प्राप्त होतो , जगण्यातला खरा आनंद मिळतो.  तमाशा चित्रपट अशाच एका कार्पोरेट तरुणाची कथा आहे ज्याला त्याची मैत्रीण, त्याला स्वतःला शोधण्यास मदत करते. 
     चित्रपटातील एक दृश्य फारच मार्मिक आहे. जिथे गोंधळलेला नायक फार वर्षांनंतर त्याच्या लहानपणापासूनच्या कथा सांगणाऱ्या बुवा  कडे जातो आणि स्वतःच्याच गोष्टीचा पुढचा भाग त्या कथाकार बुवाला विचारतो. त्यावर तो वृद्ध बुवा  त्याला उत्तर देतो की स्वतःच्या गोष्टीची उत्तरे स्वतःमध्ये असतात. जो, तो स्वतःला विचारण्याचे  धाडस करत नाही, तो मात्र खऱ्या अर्थाने आपल्याच जीवनाची फसवणूक करतो ! 



No comments:

Post a Comment