November 13, 2013

आनंद मरते नही..


निसर्ग नेहमीच आपल्याला प्रोत्साहित करत असतो , हळुवारपणे सांगत असतो की "खुल्के जिओ ..जीवन में आनंद लाओ...क्योंकी आनंद मरते नही ! " या पक्षाला देखील हेच सांगायचे असेल का? 
     भीत भीत तर किती जगायचं .. मित्रहो निसर्ग म्हणतो .. डरना मना है ! आज याचं टेंशन उद्या त्याचे .. अन्  टेन्शन येते या वाक्याने टेन्शन वाढते ! मग  अस करता येईल का ...आजपासून टेन्शन येते हा वाक्प्रचारच काढून टाकावा . अन बिन्धास्त् होवून राहावे ..या पक्षासारखे .. अगदी स्वछंद !! 



June 22, 2013

Hello, I am heart speaking...

"Dhak Dhak... Dhak Dhak... Dhak Dhak...

Hey guys, listen, listen if you're not busy!

I am your heart... wanted to say something!!! But as time passed, our conversations have dramatically reduced, and we, hearts, have also softened our voices as they no longer fit into your Hi-Tech life."


"You know what? We have a language. Wherever you go, you will find a common language that we use to speak, reflecting the oneness of this world. The language of love. 'Love' predates humanity, serving as the reason for the existence of living and non-living things.

"Hey, you know... We know your soul and its dreams. We continuously assist you in remembering your destiny and urge you to move along the correct path toward your destiny, your dreams, and the fulfillment of your desires. We remember all the things that may happen to you, whether for better or worse. We try to keep reminding you, but you often do not listen to us. Nowadays, you are behaving according to external world expectations at the cost of putting your dreams and desires aside, even for temporary excitement.

"We are deeply emotional beings. We don't want you to suffer. When your dreams remain unfulfilled, when someone you love leaves you, or when you are betrayed by others, you suffer greatly, and so do we. It's only during such instances that you try to communicate with us, feeling your heart's suffering. Because we also long to communicate with you! We need to release all the hidden sorrows within us and be pure and transparent with your soul.

"We mostly guide you towards making the right decisions. We come from this universe, and in the end, we return to it. We are linked to the entire database of the universe. To access these links, you have to be our friend. You have to contemplate with us. We love you deeply. We don't want you to suffer. But as you continue to behave according to the requirements of the material world, neglecting your 'own' path, you eventually suffer. Even though we don't stop trying to awaken you, we lower our voices. Remembering your unfulfilled dreams and desires one day becomes the cause of the worst suffering in your life, and hey, you, our beloved ones, we don't want you to suffer because of that.

"We are very active with children. Have you seen the smiles and eyes of children? That greatest joy and purest vision, without any conditions or beliefs, is God's expression. As you grow older, you start to believe in the things you see, which are merely visual reality and not true reality. Nurturing your identity for the sake of a good reputation in society inflates your ego. That is the moment when you begin to break our relationship, and one day, somebody says you are heartless. We feel the saddest!

"Guys, all we want is for you to learn our language. The language of love. Love your dreams, your real desires, your relationships, sincerely! We want you to express yourself and pursue heavenly happiness with this gift of a distinct human body. Listen to us. We are God's mediators. We desire for you to be the happiest in every moment of life. You know what? God actively resides in the hearts of every happy person."

Dhak Dhak... Dhak Dhak... Dhak Dhak...




                                                                                                 .... विश्व ताऱ्यांचे

June 11, 2013

मागे पाहताना ...

खरतर 'थेसिस सबमिशन' आणि 'त्या' आपल्या सर्वांनाच जाणीव असलेल्या शेवटच्या 'कार्यालयीन ओढाताणीमुळे' फार दिवसांपासून ब्लॉग वर येण्यास वेळचं नाही मिळाला, असो...
      पण या सगळ्या ओढतानिमध्ये आणि स्थानांतरनामध्ये  मन मात्र एका विचित्र अवस्थेतून जात होते. 'जीवन' नावाच्या गलबताच्या विविध पैलूंना हळूच स्पर्श करत होते आणि त्याची सहृदय जाणीव कधी डोळ्यांमध्ये हलक्याश्या सरी तर कधी चेहऱ्यावर हास्य उमटवत होती.
     चेन्नई चे ते दिवस खरंच फारच निराळे होते. नवीन भाषा , नवीन संस्कृती, नवीन जीवनपद्धती! सुरवातीला जरी प्रतिकूल वाटत असली, आणि जरी आपण कितीही प्रश्नांना सामोरे गेलो तरी शेवटी ते ठिकाण , तो प्रदेश सोडताना जर आपण मागे ओळून पहिले तर आपल्या लक्ष्यात येते की आपण ज्यावेळी इथे आलो त्याहून अधिक काहीतरी आहोत. आपल्या अनुकूलतेच्या व्याख्येची कक्षा नकळत रुंद झालेली असते.
    नवीन लोकांमध्ये राहताना आणि वावरताना त्यांची संस्कृती, त्यांच्या सवयी स्वीकार करताच आपल्याला लक्षात यते की they are the same people, as we are. मग तो चहा वाला अण्णा किंवा 'तंबी लाईट बिल, तंबी पानी बिल' म्हणून कान दुखेपर्यंत ओरडणारी घरमालकीन . आम्ही केवळ हातवारी अन् हावभाव ही  नवीन भाषा शिकलो😁 आमचा जवळचाच किराणा मालाचा दुकानदार वर्षभर जरी हिशोब हिशोब करत असला तरी शेवटी भाऊक झाला. शेवटचे त्याचे संभाषण जरी अर्थ नाही सामजला तरी भाऊक करून गेले. आजारी असताना माझा spiritual friend राहुलने घेतलेली निस्वार्थ काळजी विस्मयजनक होती. या दिवसांमध्ये बरेच उच्च महत्वाकांक्षा घेऊन आलेले मित्र भेटले. प्रोफेसरांबरोबरच्या नात्याने तर बरेच रंग धारण केले...प्रोजेक्ट आणि सबमिशन या प्रकारात मोडणाऱ्या सर्वानांच याची जाणीव असते 😁😁
      काही विलक्षण नाती तर फार काही शिकवून, त्याचबरोबर गुढ प्रश्न ठेऊनही गेली. काही व्यक्ती आपल्या जीवनात येतात आणि एक वेगळीच दिशा देऊन जातात. पण त्यांच्या  पाउलखुणा तशाच राहतात आयुष्यभर ! यांचा आपल्या जीवनात खरच काहीतरी रोल असतो ?
या प्रवासात वेळेचे नियोजन, समयसूचकता, गुरुनिष्ठा, नात्यांचे संगोपन अन् वाचनबद्धता यांचा अपरीहार्यता दिसून आली. हा हा ...यापैकी वेळेचे नियोजन मध्ये मी थोडा अजून ही वीक आहे . Why to lie?
      Thats all...
                       पण जाता जाता प्रश्न पडतो , Why God made us emotional beings? Because, what all I revealed is though whoever we are, from wherever we are... एक गोष्ट सेम आहे. ती म्हणजे भावना अन्  त्यातून उत्पन्न होणारे आनंदी हास्य किंवा दुखद रडू.. अन् त्याच्यातही चाललेली आयुष्यभराची धडपड!   विशेष म्हणजे हे अन्य प्राण्यांना ही लागू आहे ह .. कारण एक तमिळ डॉग माझा चांगला दोस्त झालाता राव 😁





                                                                                                                                विश्व ताऱ्यांचे ..
     
                                                                                                                            


April 19, 2013

सदरा सुखी माणसाचा ..!

प्रसंग - आय. आय. टी. मद्रास
सायंकाळची वेळ.
       लॅब मधील काम आटपून मी रूम मध्ये जाण्यासाठी इलेक्ट्रीकॅल विभागाच्या बस थांब्यावरच्या कट्ट्यावर बसलेलो होतो. इथे देश्यातल्या सर्व भागातून विध्यार्थी येत असल्याने कोणाची कोणती मातृभाषा असेल हे सांगता येत नाही.
      कडेलाच एक मुलगा बसलेला . योगायोगाने तो मराठी भाषिक निघाला . फोनवर त्याच बोलणं चालल होत .मराठी कुठे कुठेच ऐकायला मिळत असल्याने कान आपोआपच त्या दिशेकडे वळले. त्याच फोन वर बोलणं नव्हे तर रडनेच चालू होते अस म्हणणं वावग ठरणार नाही . बहुदा तो पालकांशी बोलत असावा .
      बोलण्याचा रोख असा होता की ,' इंटर्नशिप नाही मिळाली आतापर्यंत, आयुष्य वाया गेल. इतक करूनसुद्धा काही उपयोग झाला नाही . मी फोन ठेवतो आता , मला सहानुभूती नकोय' वगैरे वगैरे .....
मला खरोखरच विस्मयजनक वाटल आणि विचारांचं वादळ हुंकारू लागलं.
    आय . आय . टी . सारख्या संस्थांमधून इंजिनिरिंग करण प्रत्येकाच स्वप्न असतं. मला इथे इंटर्नशिप मिळाली त्यावेळी खूप आनंद झाला होता . तर हा मुलगा इथून बाहेर इंटर्नशिप मिळाली नाही म्हणून अतिशय दुखी होता.त्यान फोन ठेवताच त्याला विचारले , " काय रे इतका का दुखी आहेस ?" त्यान सर्व वरील दुखी कथा सांगितली.
मी म्हंटल , "अरे इथे मी ज्या कारणासाठी आलोय आणि ज्यामुळे मी खुश झालो होतो  त्याच कारणासाठी तू इथून बाहेर जाण्यासाठी दुखी आहेस !!"   क्षणभर आम्ही दोघे ही शांत ....
थोड्याच वेळात त्या दुखी चेहऱ्यावर हसू उमटले आणि आम्ही दोघे ही हसू लागलो.
मनुष्यवृत्तीच अशी आहे की नेहमी त्याला आणखी हवे असते. इच्छा असणे जरुरी आहे किबहुना असायलाच हवी पण ती पूर्ण नाही झाली म्हणून  लगेच आयुष्य वाया ?? आमच्या दोघांच्या परिस्थितीमधून  एक सुटलेली कडी आढळून आली ती म्हणजे आपण जे आहोत त्याबद्दल समाधान न असण. हे कुठतरी थांबायला हव.
    सुखी माणसाचा सदरा मिळेल का ? अशी एक कथा आहे.अन् त्यानुसार हे अशक्य आहे. पण मला तो या सुटलेल्या कडी मध्ये दिसला ,जेंव्हा आम्ही दोघेही  काहीही स्पष्टीकरण न देता खूप हसलो. तो कुणी कसा वापरायचा हा ज्याच्या त्याच्या जीवन पद्धतीचा भाग आहे. पण तो आहे यावर विश्वास ठेवा  , त्याला ओळखण्याची आणि वापरण्याची सवय नाहीय एवढेच ..!! तर मग काय , मित्र हो कराना ही पण एक सवय ..
आपण जे आहोत त्याला समाधानाणे स्वीकार करायची..!!
                                                                                                                                         विश्व ताऱ्यांचे

April 14, 2013

मनपाखरू

मन ...
खरतर याला कसं अन् कुठ बांधून ठेवायचं.
प्रत्येक ठिकाणी  धाव घेतच ..अल्लड.. उनाड.. अगदी प्रकाशाच्या गतीलाही मागे टाकून!
या मनाचे रंग ते किती !        
 कधी हसवत इतकं.. की वाटत आपण जगात सर्वात सुखी आहोत.. तर कधी लहान मुलाप्रमाणे रडवतही, सारे जगच दुखमय भासतं! कधी अभिमान, तर कधी अपमान.
कधी आश्चर्य, तर कधी निराशा..
कधी जय, तर कधी पराजय .. 


 


स्वप्नांचा डोलारा उभा करणं हा तर मनाचा हक्काचा भाग ... इतकी स्वप्न पाहायची ... अन् पुरी नाही झाली की स्वप्नभंग अन् पूर्ण झाली की नवीन स्वप्न... कारण याला काही कक्षाच नसतात ना.. आणि एवढ्यात समाधान मानेल तर ते मन कसलं! कोणी याला अलगत जपतं, कोणी बेतालपणे, तर कोणी कठोरतेणे.
      अस म्हणतात की मनाला शिस्त लावली की आपोआप सगळ सुरळीत चालतं ..पण सगळचं सुरळीत झाल तर आयुष्य ते कसले? आणि मज्जा ती कसली..!!  पण काहींही  म्हणा, याच अस्तित्व जीवनात बहार निर्माण करते. माझ्या एका दोस्ताचा फेमस डायलॉग आहे, तो नेहमी म्हणतो "गड्याव, जीवनात रंग पाहिजे राव..!" अगदी  खर आहे .
      माझ्यासाठी मन हे एक  फुलपाखरु आहे...त्याला स्वछंद फुलापाखाराप्रमाणे उडून द्यायचे.. भावनांच्या सुमनांवर...कधी या फुलावर कधी त्या फुलावर अलगतच.. नाहू द्यायचं त्याला जीवनाच्या प्रत्येक रंगात... महत्वाचा भाग असा की हे सर्व, फुलाला कोणतीही हानी न पोहोचवता...धक्का न पोहचवता.. मध मात्र  गोळा करायचा.. तो पण किती.. जगण्यापुरताच.. वर्तमानापुरताच!  इतकं सोप नाही हे, कारण 'फुलपाखराला सुद्धा फुलपाखरू बनण्यासाठी वेगवेगळ्या अवस्थांतून जावे लागते.'
        पण ही सहजता आली की जीवनपुष्प रंगमय होऊन आलेल्या प्रत्येक वादळात टवटवीत राहील, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत अन् क्षणानंतरही.. इतरांना आपल्या अस्तित्वाच्या सुगंधाने आनंदित करण्यासाठी.
                                                                                                                                                                                                                                                                                        ....विश्व ताऱ्यांचे
                                                                                                

April 11, 2013

Believe !!!


      Belief has great importance in our lives. When we keep faith on a person or a thing we should think..think twice..thrice..!! And then once you believed give yourself  with belief such that you would not get a chance to see back. Belief includes tremendous power in it.

       Believe, 'if a person in this world can do a thing, achieve something , you also can do the same.'
Many of the impossible things in first sight , has been possible on the basis of just mere a thought , 'yes we can'. The most important thing that, I can say 'missing link' is consistency in believing. Most of the time due to lack of patience in this fast running day today life we are tending toward forgetting things, values, principles and beliefs so rapidly that results in undesired outcomes, scenes which gives strength to our thoughts of impossibilities.

        It is the power or we can say first inspiring, dazzling thought which gives rise to revolutionary inventions, great relationships, freedom, great religions and many more. My intention here is to remember, we should start believing , learn to believing right things at the right time , wisely.
Believe !!!

April 9, 2013

अपेक्षा करावी ?


    चहा  पिता पिता मनन करणे खरंच मस्त वाटते ..का कुनासठाऊक शब्द निर्मिती होता होता अतिशयोक्ती ही होतेच !! त्यात मनाला पडलेले असंख्य प्रश्न ..उत्तरे मिळाली की   मन शांत होईल ही वेडी आशा ..एका दोस्ताने सांगितलेले अगदी खरंच आहे, आलेल्या परिस्थितीचा सामना करणे एवेढेच आपल्या हाती असते ..आलेल्या परिस्थितीला तोंड देऊन त्यातून ही आनंद मिळवता येईल का हा एक वेडा पण खुपच प्रभावी विचार !!!
    प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात येते त्याला खरंच एक कारण असते ..पण एकाच व्यक्ती विषयी वारंवार विचार येणे हे थोडे विस्मयजनक आहे . यातून अपेक्षा अन् अपेक्षाभंग अशी परावर्तने सुरु होता ..त्यामुळे अपेक्षा करतानाही एकाच व्यक्तीकडून न करता अपेक्षा जिथून निर्माण होते त्या निर्मात्या कडूनचं करावी...यामुळे होईल काय ..अपेक्षाभंगाचे खापर कमीत कमी आपण त्या व्यक्तीवर तर फोडणार नाही अन् त्या व्यक्तीबद्दल मन कलुशीत होणार नाही  . कारण इथे आपण अपेक्षा पूर्तीचा स्त्रोतच बदलतोय आणि मग आलेल्या परिस्थितीला त्या निर्मात्याचीच इच्छा मानून स्वीकार करायचा..आनंदाने .!!
 सांगायचा मुद्दा हाच की ...  
    अपेक्षा हे दुखाचे कारण आहे हे सार्वजनिक विधान आपण फोल ठरवू शकतो जर  आपण अपेक्षा पूर्तीचा स्त्रोतच बदलला..आणि त्या निर्मात्यावर पूर्ण विश्वास ठेऊन दिलेल्या प्रसादाचा स्वीकार केला .
     अरे , विचार करता करता चहा संपला ...कळलेही नाही.आजून एक कप चहा हवा आहे ... पैसे तर संपले ..अण्णा और एक कप टी मिलेगा क्या ??  अपेक्षा ...हा हा हा ..पण स्त्रोत बदलला ..चेहऱ्यावर एक स्माईल आली ..अण्णा च्या ही चेहऱ्यावर हसू आले .."लेलो तंबी ..पैसा कल देना.."
                                                                                                                           .... विश्व ताऱ्यांचे


"

April 8, 2013

प्रेम म्हणजेच जीवन अन् जीवन म्हणजेच प्रेम ..

प्रेम

    राधेच कृष्णावरील ,मीरेच मधुसुदनावरील ,रामाच सितेवरील ...

प्रेम 
    
    दशरथाचे रामचंद्रावरील , वासुदेवाचे कृष्णावरील ...

प्रेम 
  
     हिरकणीचे आपल्या बाळावरील , सिंधुताईंचे आपल्या मुलांवरील ,एका मायेच लेकरावरील ....

प्रेम 
      श्रावणबाळाचे माता पित्यांवरील , भक्त प्रल्हादाचे नारायनावरील...

प्रेम 
    
      द्रोणाचार्याचे  अर्जुनावरील , कर्मवीरांचे विद्यार्थ्यांवरील, सानेगुरुजीचंचे शिष्यांवरील...

प्रेम 

    शिवरायांचे जनतेवरील , बाबा आमट्यांचे कुष्ठरोग्यांवरील, मदर तेरेसांचे पिडीतांवरील ...

प्रेम 
    त्या हुतात्म्यांचे देशावरील ,कलाकाराचे कलेवरील , ज्ञानोपासाकाचे ज्ञानावरील....
        
            प्रेम म्हणजेच जीवन अन्  जीवन म्हणजेच प्रेम ..
                                                                  ...  विश्व ताऱ्यांचे 
       .

April 7, 2013

शब्दतरंग








      " लिहायच म्हणजे भरपूर लिहिता येत.  लिहिणं म्हणजे मनातले तरंग कागदावर उठवणं. याला काही कोणत्या जाती धर्माचं किंवा गोत्राचं असण आवश्यक नाही. जिवंत असण्याची गरज आहे, मग तो सुखाचा धागा असो वा दुखाचा डोंगर ..!! भावनांचा हा लपंडाव अलगतच कलमातून उतरावयाचा. एकदा हा खेळ सुरु झाला की संपता संपत नाही .. 
मग शाई संपेल असा  कंजुषीचा भाव मनात आणून कलमाला विश्रांती द्यायची !"
                                                                                                                                       विश्व ताऱ्यांचे
   

April 6, 2013

ताऱ्यांच्या विश्वात स्वागत ...मनांचे...हृदयांचे ...आणि चिरंतन अस्तित्वात असलेल्या विचारांचे ....

शुभेच्छा


  

  " आपण सारे तारे ....  एका अद्रुश्य अशा धाग्यांनी त्या निर्मात्याला जोडलेले....अन् हृदय ही जणू त्याची प्रतिमा ...आशा करतो ..ताऱ्यांच्या या विश्वात भरारी मारताना ..या धाग्याचा कुणालाही विसर न पडो..."

                                                                                                                     विश्व ताऱ्यांचे