April 19, 2013

सदरा सुखी माणसाचा ..!

प्रसंग - आय. आय. टी. मद्रास
सायंकाळची वेळ.
       लॅब मधील काम आटपून मी रूम मध्ये जाण्यासाठी इलेक्ट्रीकॅल विभागाच्या बस थांब्यावरच्या कट्ट्यावर बसलेलो होतो. इथे देश्यातल्या सर्व भागातून विध्यार्थी येत असल्याने कोणाची कोणती मातृभाषा असेल हे सांगता येत नाही.
      कडेलाच एक मुलगा बसलेला . योगायोगाने तो मराठी भाषिक निघाला . फोनवर त्याच बोलणं चालल होत .मराठी कुठे कुठेच ऐकायला मिळत असल्याने कान आपोआपच त्या दिशेकडे वळले. त्याच फोन वर बोलणं नव्हे तर रडनेच चालू होते अस म्हणणं वावग ठरणार नाही . बहुदा तो पालकांशी बोलत असावा .
      बोलण्याचा रोख असा होता की ,' इंटर्नशिप नाही मिळाली आतापर्यंत, आयुष्य वाया गेल. इतक करूनसुद्धा काही उपयोग झाला नाही . मी फोन ठेवतो आता , मला सहानुभूती नकोय' वगैरे वगैरे .....
मला खरोखरच विस्मयजनक वाटल आणि विचारांचं वादळ हुंकारू लागलं.
    आय . आय . टी . सारख्या संस्थांमधून इंजिनिरिंग करण प्रत्येकाच स्वप्न असतं. मला इथे इंटर्नशिप मिळाली त्यावेळी खूप आनंद झाला होता . तर हा मुलगा इथून बाहेर इंटर्नशिप मिळाली नाही म्हणून अतिशय दुखी होता.त्यान फोन ठेवताच त्याला विचारले , " काय रे इतका का दुखी आहेस ?" त्यान सर्व वरील दुखी कथा सांगितली.
मी म्हंटल , "अरे इथे मी ज्या कारणासाठी आलोय आणि ज्यामुळे मी खुश झालो होतो  त्याच कारणासाठी तू इथून बाहेर जाण्यासाठी दुखी आहेस !!"   क्षणभर आम्ही दोघे ही शांत ....
थोड्याच वेळात त्या दुखी चेहऱ्यावर हसू उमटले आणि आम्ही दोघे ही हसू लागलो.
मनुष्यवृत्तीच अशी आहे की नेहमी त्याला आणखी हवे असते. इच्छा असणे जरुरी आहे किबहुना असायलाच हवी पण ती पूर्ण नाही झाली म्हणून  लगेच आयुष्य वाया ?? आमच्या दोघांच्या परिस्थितीमधून  एक सुटलेली कडी आढळून आली ती म्हणजे आपण जे आहोत त्याबद्दल समाधान न असण. हे कुठतरी थांबायला हव.
    सुखी माणसाचा सदरा मिळेल का ? अशी एक कथा आहे.अन् त्यानुसार हे अशक्य आहे. पण मला तो या सुटलेल्या कडी मध्ये दिसला ,जेंव्हा आम्ही दोघेही  काहीही स्पष्टीकरण न देता खूप हसलो. तो कुणी कसा वापरायचा हा ज्याच्या त्याच्या जीवन पद्धतीचा भाग आहे. पण तो आहे यावर विश्वास ठेवा  , त्याला ओळखण्याची आणि वापरण्याची सवय नाहीय एवढेच ..!! तर मग काय , मित्र हो कराना ही पण एक सवय ..
आपण जे आहोत त्याला समाधानाणे स्वीकार करायची..!!
                                                                                                                                         विश्व ताऱ्यांचे

2 comments:

  1. खरेय प्रत्येकाने समाधानाने राहायला पाहिजे

    ReplyDelete
    Replies
    1. आयुष्यात हीच खरी अपेक्षा असते..समाधान..!

      Delete