April 9, 2013

अपेक्षा करावी ?


    चहा  पिता पिता मनन करणे खरंच मस्त वाटते ..का कुनासठाऊक शब्द निर्मिती होता होता अतिशयोक्ती ही होतेच !! त्यात मनाला पडलेले असंख्य प्रश्न ..उत्तरे मिळाली की   मन शांत होईल ही वेडी आशा ..एका दोस्ताने सांगितलेले अगदी खरंच आहे, आलेल्या परिस्थितीचा सामना करणे एवेढेच आपल्या हाती असते ..आलेल्या परिस्थितीला तोंड देऊन त्यातून ही आनंद मिळवता येईल का हा एक वेडा पण खुपच प्रभावी विचार !!!
    प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात येते त्याला खरंच एक कारण असते ..पण एकाच व्यक्ती विषयी वारंवार विचार येणे हे थोडे विस्मयजनक आहे . यातून अपेक्षा अन् अपेक्षाभंग अशी परावर्तने सुरु होता ..त्यामुळे अपेक्षा करतानाही एकाच व्यक्तीकडून न करता अपेक्षा जिथून निर्माण होते त्या निर्मात्या कडूनचं करावी...यामुळे होईल काय ..अपेक्षाभंगाचे खापर कमीत कमी आपण त्या व्यक्तीवर तर फोडणार नाही अन् त्या व्यक्तीबद्दल मन कलुशीत होणार नाही  . कारण इथे आपण अपेक्षा पूर्तीचा स्त्रोतच बदलतोय आणि मग आलेल्या परिस्थितीला त्या निर्मात्याचीच इच्छा मानून स्वीकार करायचा..आनंदाने .!!
 सांगायचा मुद्दा हाच की ...  
    अपेक्षा हे दुखाचे कारण आहे हे सार्वजनिक विधान आपण फोल ठरवू शकतो जर  आपण अपेक्षा पूर्तीचा स्त्रोतच बदलला..आणि त्या निर्मात्यावर पूर्ण विश्वास ठेऊन दिलेल्या प्रसादाचा स्वीकार केला .
     अरे , विचार करता करता चहा संपला ...कळलेही नाही.आजून एक कप चहा हवा आहे ... पैसे तर संपले ..अण्णा और एक कप टी मिलेगा क्या ??  अपेक्षा ...हा हा हा ..पण स्त्रोत बदलला ..चेहऱ्यावर एक स्माईल आली ..अण्णा च्या ही चेहऱ्यावर हसू आले .."लेलो तंबी ..पैसा कल देना.."
                                                                                                                           .... विश्व ताऱ्यांचे


"

2 comments: